अन्यायकारक व्यवस्थेला सुरुंग लावणारी आणि नवीन राष्ट्राची क्रांतिकारक संकल्पना मांडणारी कविता
आज गरज आहे ती एका टीकाकुशल, बुद्धिनिष्ठ, तर्कसंगत जाणिवेच्या सक्षम वैचारिक पिढीची. डॉ. ज्योती लांजेवारांनी आपला मूळ वैचारिक गाभा सांभाळून कुठल्याही वर्गीकरणाच्या संकुचितपणामध्ये न अडकता, समानतावादी विचार बाळगणारे प्रवाह आणि माणसं यांना आपलंसं केलं व स्वत:ची अविस्मरणीय अशी छाप प्रत्येक मनावर सोडली. डॉ. ज्योती माझ्यासारख्या अनेकांसाठी एक विश्वासार्ह प्रशिक्षण केंद्र म्हणून कायम आहेत.......